" काही काही लहान मुलांना ओळखीची गरज वाटत नाही. अनोळखी पाहुण्याने जरी कडेवर घेण्यासाठी हात पुढे केले तरी अशी मुलं त्यांच्याकडे झेपावतात. कविता पण तशाच असतात. हात पुढे करणारा माणूस आपल्याला खांद्दयावर खेळवणारा आहे, ह्याची खात्री पटली की त्या माणसाकडे त्या कायम मुक्कामाला येतात. "